शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:52 IST

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा केले व योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित रक्कम जमा करण्याचे ठरले.

आरवडे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर मंदिरात लोढे तलाव बारमाही करण्यासाठी पूर्वभागातील गावातील शेतकºयांची बैठक पार पडली होती. बैठकीला आरवडे, डोर्ली, कौलगे, सावर्डे, लोढे या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

लोढे तलाव तासगाव पूर्व भागातील मोठा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता १६३ दशलक्ष घनफूट आहे. या तलावावर या परिसरातील आरवडे, लोढे, कौलगे, सावर्डे, डोर्ली, चिंचणी या गावांच्या शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. बरीच वर्षे या दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हा तलाव मागील बरीच वर्षे पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. परिणामी तलावाच्या परिसरातील बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर या भागातील शेतीला वर्षभर फायदा होतो. येथून पेयजल योजनेद्वारे पाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया स्वतंत्र पाणीयोजना आहेत. शेतीच्या पाण्यासाठी एकूण १६४ स्वतंत्र पाईपलाइन शेतकºयांनी स्वखर्चाने केल्या आहेत. त्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. परंतु त्याचा शेतीसाठी पुरेसा फायदा झाला नाही. मागील २० वर्षांत पावसाच्या पाण्याने दोनवेळा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे शेतकºयांनी गुंतवलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

चार वर्षांपूर्वी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून विसापूर-पुणदी उपसा सिंचन पाणीयोजना अस्तित्वात आली. या योजनेतून शासनाच्या माध्यमातून हा तलाव भरला जाईल, अशी शेतकºयांना आशा होती; परंतु या योजनेतून आतापर्यंत या तलावात ४० दशलक्ष घनफूट पाणी केवळ पिण्यासाठी आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी कोणत्याही राजकीय नेत्यावर विसंबून न राहता एकत्रित येऊन शासनाच्या नियमानुसार प्रतिदशलक्ष घनफूट ४२,८०० रुपये भरून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यायचा, असे या बैठकीत ठरवले. यावेळी प्रति शेतीपंप ३० हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा करण्यास सर्व शेतकºयांनी होकार दिला व आठ दिवसात सर्वांनी पैसे जमा करून लवकरात लवकर तलाव भरून घ्यायचे सर्वानुमते ठरले.पंधरा दिवसांत योजना सुरू होणारपुणदी सिंचन योजनेचे अभियंता एस. एस. रासनकार म्हणाले की, १५ दिवसात पाणीयोजना सुरू होईल व शेतकºयांनी शासन नियमनुसार पैसे भरले, तर तलावात पाणी सोडण्यास काही अडचण येणार नाही. शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे. आमच्या विभागाकडून सर्वतोपरी आम्ही मदत करू. 

एकजुटीचे प्रयत्नराजकारण बाजूला ठेवून लोढे तलाव बारमाही करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. लोढे तलाव बारमाही झाला तरच बागायती शेती जिवंत राहील, अशा प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त झाल्या.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली