शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

लोढे तलाव बारमाही करणार -सहा गावांचे शेतकरी एकत्र : बारा लाख भरले; विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:52 IST

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा

मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा केले व योजना सुरू झाल्यानंतर उर्वरित रक्कम जमा करण्याचे ठरले.

आरवडे (ता. तासगाव) येथील सिद्धेश्वर मंदिरात लोढे तलाव बारमाही करण्यासाठी पूर्वभागातील गावातील शेतकºयांची बैठक पार पडली होती. बैठकीला आरवडे, डोर्ली, कौलगे, सावर्डे, लोढे या गावांतील शेतकरी उपस्थित होते.

लोढे तलाव तासगाव पूर्व भागातील मोठा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता १६३ दशलक्ष घनफूट आहे. या तलावावर या परिसरातील आरवडे, लोढे, कौलगे, सावर्डे, डोर्ली, चिंचणी या गावांच्या शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे भवितव्य अवलंबून आहे. बरीच वर्षे या दुष्काळी पट्ट्यात समाधानकारक पाऊस नसल्याने हा तलाव मागील बरीच वर्षे पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. परिणामी तलावाच्या परिसरातील बागायती शेती उद्ध्वस्त झाली आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला तर या भागातील शेतीला वर्षभर फायदा होतो. येथून पेयजल योजनेद्वारे पाच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाºया स्वतंत्र पाणीयोजना आहेत. शेतीच्या पाण्यासाठी एकूण १६४ स्वतंत्र पाईपलाइन शेतकºयांनी स्वखर्चाने केल्या आहेत. त्यासाठी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. परंतु त्याचा शेतीसाठी पुरेसा फायदा झाला नाही. मागील २० वर्षांत पावसाच्या पाण्याने दोनवेळा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यामुळे शेतकºयांनी गुंतवलेले कोट्यवधी रुपये वाया गेले आहेत.

चार वर्षांपूर्वी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रयत्नातून विसापूर-पुणदी उपसा सिंचन पाणीयोजना अस्तित्वात आली. या योजनेतून शासनाच्या माध्यमातून हा तलाव भरला जाईल, अशी शेतकºयांना आशा होती; परंतु या योजनेतून आतापर्यंत या तलावात ४० दशलक्ष घनफूट पाणी केवळ पिण्यासाठी आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांनी कोणत्याही राजकीय नेत्यावर विसंबून न राहता एकत्रित येऊन शासनाच्या नियमानुसार प्रतिदशलक्ष घनफूट ४२,८०० रुपये भरून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्यायचा, असे या बैठकीत ठरवले. यावेळी प्रति शेतीपंप ३० हजार रुपयाप्रमाणे पैसे जमा करण्यास सर्व शेतकºयांनी होकार दिला व आठ दिवसात सर्वांनी पैसे जमा करून लवकरात लवकर तलाव भरून घ्यायचे सर्वानुमते ठरले.पंधरा दिवसांत योजना सुरू होणारपुणदी सिंचन योजनेचे अभियंता एस. एस. रासनकार म्हणाले की, १५ दिवसात पाणीयोजना सुरू होईल व शेतकºयांनी शासन नियमनुसार पैसे भरले, तर तलावात पाणी सोडण्यास काही अडचण येणार नाही. शेतकºयांनी पैसे भरून सहकार्य करावे. आमच्या विभागाकडून सर्वतोपरी आम्ही मदत करू. 

एकजुटीचे प्रयत्नराजकारण बाजूला ठेवून लोढे तलाव बारमाही करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. लोढे तलाव बारमाही झाला तरच बागायती शेती जिवंत राहील, अशा प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त झाल्या.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली